नाशिकमध्ये आज मंगळवारी दुपारी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. त्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी आणि पालक यांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला.
त्याचे झाले असे की, एक स्कूल बस आग लागल्यामुळे जळून खाक झाली. मात्र, या घटनेत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील पंचवटी परिसरात ही घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि दोन शिक्षिका होत्या. मात्र, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
कशी घडली घटना?
नाशिकमधील पंचवटी – म्हसरूळ भागात ही घटना घडली. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती मावळली आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आज शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येत होते. तेव्हा अचानक एका स्कूल बसला आग लागली. त्यामुळे विद्यार्थी आणि आतील दोन शिक्षिका या घाबरून गेल्या.
दरम्यान, गाडीला आग लागल्याचे समजताच चालकाने गाडी थांबवून विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तसेच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.हे पथक येईपर्यंत स्कूल बस व्हॅन जळून खाक झाली. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.
आता ही घटना नेमकी कशामुळे झाले याची चर्चा रंगली आहे. प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…