सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेलाय. कारण मराठा आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर १२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.
यावर बोलताना पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं. तसेच अधिकार नसतांना राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने असे आरक्षण दिल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं होतं.
मात्र मागच्या लोकसभेच्या अधिवेशनात स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे की, सर्व आरक्षण देण्याचे अधिकारी राज्य सरकारलाच आहे. त्यामुळे ह्या सर्व मुद्यांच्या आधारावर ही याचिका दाखल करण्यात आल्याचं विनोद पाटील म्हणाले.
तर याचवेळी राज्य सरकारला विनंती करताना विनोद पाटील म्हणाले की, जे-जे करावे लागेल, जश्या-जश्या पद्धतीने मांडणी करावी लागेल, ते-ते राज्य सरकारने करावे. तसेच पुन्हा एकदा मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी विनंती विनोद पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…