ताज्याघडामोडी

केंद्राने महाराष्ट्राला काय दिले नाही हे राज्याच्या मंत्र्यांनी लेखी द्यावे – भारती पवार

महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळात संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिले नाही, याबाबत राज्यातील कुणी एका मंत्र्याने लेखी द्यावे, असेही म्हटले. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिले नसेल, तर या राज्याची मी हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असेही भारती पवार यांनी नमूद केले.

डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, राज्य सरकार मागते आणि केंद्र सरकार देत नाही, असे महाराष्ट्रातील कुणी मंत्र्यांनी लेखी दिले, तर मलाही बरे होईल. आम्ही किती निधी दिला आणि त्यातील किती निधी राज्यात खर्च झाला हा पण प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकारने आयसीयू बेड, ऑक्सिजनची क्षमता, औषधे यासाठी निधी मंजूर केला आहे. प्रत्येक जिल्ह्याला औषधांचा साठा उपलब्ध पाहिजे. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून (NHM) देखील औषधांची मागणी करता येते.

राज्य सरकारने हे सर्व पाहता किती मागणी केली? त्यानंतरही केंद्राने दिले नसेल, तर या राज्याची मी हक्काची मुलगी म्हणून सांगते, मला तरी द्या. राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाही, याबाबत आम्हाला आजपर्यंत कोणतेही पत्र मिळाले नाही. उलट आम्ही हे दिले आता हे खर्च करा म्हणून सांगत आहे.

राज्यात काम चालू आहे. राज्य सरकार काम करत नाही, असा माझा अजिबात आक्षेप नाही, परंतू संथगतीने काम चालू असल्याचा आरोप भारती पवार यांनी केला. आज आपण लवकर काम केले नाही, तर उद्या धावपळ होईल. राज्य सरकारने थोडी गती वाढवावी अशी माझी विनंती असल्याचेही भारती पवार यांनी नमूद केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago