ताज्याघडामोडी

सुरू होण्याआधीच मोडला संसार; लग्नानंतर आठ दिवसांत तरुणाची आत्महत्या

हिंगोलीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या तरुणाचं आठ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. संसाराची घडी बसण्याआधीच आकाशने आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या वंजारवाडी शिवराममधील शेतात असलेल्या आखाड्यावर एका लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन हिंगोलीच्या एका २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा तरुण हिंगोलीच्या महादेव वाडी परिसरातील रहिवासी आहे. आकाश भानुदास कुटे वय २६ असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने कोणतीही सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे.

या तरुणाने उचललेल्या धक्कादायक पावलामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. आकाशचा आठ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. शहरातील महादेव वाडी येथील तरुणीशी त्याची रेशीम गाठ बांधली होती. परंतु लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे त्याचा संसार अर्ध्यावरच राहिला. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago