तमिळनाडूमध्ये एका दाम्पत्याने तिसरीही मुलगीच झाली म्हणून नवजात बाऴाला जीवे मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या मदुराई जिल्हयात ही घटना घडली असून या प्रकरणातील आई वडिल हे त्यांच्या दोन मुलींसह फरार झाले आहेत.
या दाम्पत्याने मुलीला जिवंत जमिनीत पुरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ओ मुथूपांडी याची पत्नी असलेल्या कौसल्या हिने 21 डिसेंबर रोजी सेडापत्ती प्राथमिका आरोग्य केंद्रात एका सुदृढ बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची प्रकृती ठणठणीत होती. सहा दिवसानंतर 26 डिसेंबर रोजी गावातील एक परिचारिका आई आणि बाळाची तपासणी करायला आली त्यावेळी कौसल्या हिने बाळ दगावल्याचे तसेच घरासमोर त्याचे अंत्यसंस्कारही केल्याचे त्यांनी त्या परिचारिकेला सांगितले. ते ऐकून तिला धक्काच बसला. परिचारिकेला हा संशयास्पद मृत्यू असल्याची शक्यता वाटल्याने तिने या घटनेची पोलिसात खबर दिली. परिचारिकेने पोलिसांना कळविल्यानंतर मुथूपांडी व कौसल्या घाबरले व त्यांनी त्यांच्या दोन मुलींना घेऊन गावातून पळ काढला.
दरम्यान आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बाळाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी बाळाचा पुरलेला मृतदेह देखील बाहेर काढला जाऊ शकतो. याप्रकरणी पोलिसांनी पालकांविरोधात कलम 318 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…