राजस्थान ते विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात दीड ते दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीत घट झाली आहे.
राज्यात 28 ते 30 डिसेंबर या काळात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. याची तीन कारणे आहेत. दक्षिण-पश्चिम राजस्थान ते विदर्भ भागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तिकडून थेट विदर्भात पाऊस
येण्याची शक्यता आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा होणार असल्याचा अंदाज आहे.
पूर्व अफगाणिस्तान व पाकिस्तानात पश्चिम भागात चक्रवात सक्रिय झाला आहे. तसेच राजस्थान व बिहारमध्ये वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने देशातील 26 राज्यांत आगामी तीन दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात दाट धुक्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…