ताज्याघडामोडी

शाळा सुरु होताच पोरांचे पराक्रम सुरु; विद्यार्थ्याने आपल्या २० मित्रांना पाजले विष

मागील दीड वर्षांचा कालावधी मध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची सवयच राहिलेली नाही त्यामुळे आता काही भागांमध्ये ऑफलाइन शिक्षण जरी सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची इच्छा कमी झाली आहे.

त्यामुळे शाळेत न जाण्यासाठी युक्त्या-प्रयुक्त्या योजल्या जात आहेत याबाबत एक अतिरेकी घटना ओडिशात समोर आली आहे केवळ शाळेत जायला लागू नये आणि शाळेला सुट्टी मिळावी या हेतूने एका विद्यार्थ्यांने आपल्या तब्बल २० मित्रांवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या वीस मित्रांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये त्याने कीटकनाशक मिसळले राजधानी भुवनेश्वर मधील बाटली ब्लॉक या प्रदेशातील अकरावी आणि बारावीतील वीस विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीसाठी आणि उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याने हॉस्टेलमधील या सर्व विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये कीटकनाशक मिसळले असल्याची माहिती शाळेच्या प्रशासनाने दिली आहे या विद्यार्थ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुलांसाठी असलेला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

या शाळेचे शिक्षक रवि नारायण साहू यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे निश्चित किती विद्यार्थ्यांच्या पाण्यामध्ये या विद्यार्थ्याने कीटकनाशक मिळाले विसरले आहे हे अद्याप समोर आले नसले तरी सर्व विद्यार्थ्यांच्या पाण्याची तपासणी केली जात आहे.

रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक नाही. कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले जात असतानाच आणि शैक्षणिक व्यवहार सुरू होत असतानाच अशा प्रकारची घटना घडल्याने ओडिशामध्ये खळबळ माजली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago