शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील पाटे गावात घडली आहे. या घटनेमुळे पाटे गावावर शोककळा पसरली आहे. पाटे येथील प्रगतशील शेतकरी संजय तळेकर यांचा मोठा मुलगा ओम (१३) व लहान मुलगा साईल हे बुधवार सकाळी बारा वाजेच्या सुमारास शेत गट नंबर ७० लगत असलेल्या नाल्या जवळ बकऱ्या चरत होते.
मुलं नेहमीप्रमाणे शेळ्या चरण्यासाठी गेले होते. तेथे जवळच शेततळं होतं. शिवाय पावसामुळे शेततळं काटोकाट भरलं होतं. त्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे घरात शोककळा पसरली आहे.
यावेळी ते त्यांच्याच शेततळ्यातील पाण्यात पडले. शेततळे पूर्ण पाण्याने भरले असल्याने त्यांचा शोध घेण्यात वेळ लागला. जवळपास एक तासानंतर नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्यातून बाहेर काढीत त्यांना उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघेही मयत झाल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्या घरच्यांनी ओम अन साईलच्या नावाचा एकच टाहो फोडल्याने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर सुन्न झाला होता. संजय तळेकर यांना ओम व साईल हे दोघेच मुले असल्याने त्यांचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण पाटे गावातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…