आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संत कबीरनगर येथे ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उघडकीस आला. या महिलेच्या अंगावर ३६ वार करण्यात आले असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत कबीरनगर येथे राहणाऱ्या पूजा आंबेकर (२७) या संदीप आंबेकर नामक व्यक्तीसोबत वास्तव्यास होत्या. मध्यरात्री दोघांमध्ये काही तरी कारणातून वाद झाले. या वादातून संशयिताने पूजा यांच्या सर्वांगावर चाकूने वार करत त्यांचा खून केला. आरडाआेरड झाल्याने शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. घटनेनंतर संशयित फरार झाला होता. गंगापूर पोलिसांच्या गुन्हे शोधपथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये धाव घेतली. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. प्रथमदर्शनी अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संत कबीरनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…