अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून आता सर्व वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी चालत कार्तिकी वारीला जाण्याची परवानगी मिळाली आहे.
कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी वारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान या वारीला मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं जिल्हा प्रशासनानंसह आपत्ती व्यवस्थापन तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे कार्तिकी वारीसाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
17 एप्रिल 2020 पासून वारकऱ्यांना एकाही वारीला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती मात्र आता आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी जाण्याची संधी मिळणार असल्यानं सर्व वारकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.
आषाढी, कार्तिकी, चैत्र, माघ या चार वारींच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात. मात्र मागील काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूनीवरती पायी वारी सोबत चालत जाण्यासाठी सरकारने बंधने घातली होती.तसेच कोरोनाच्या दोन लाटेंमध्ये आषाढी वारीला मानाच्या पालख्या ST बसेसमधून पंढरीत दाखल झाल्या होत्या. त्यावेळी ठराविक वारकरीच वारीत सहभागी झाले होते.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…