राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील नव्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. ‘पहचान कौन’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.
तर दुसरीकडे जन्मदाखल्याचा फोटो शेअर केला असून इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. तुम्ही धर्म लपवून खोटे दाखले काढत आहात, एका मागावर्गीयाचा अधिकार हिसकावून घेत आहात आणि सत्यमेव जयेत म्हणता अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
“गेले १४ ते १५ दिवस किरण गोसावी, भानुशाली, फ्लेचर पटेल, मालदीवचा दौरा या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर कोणताही खुलासा करत नाहीत. राजकीय आरोप आहे असं त्यांचं म्हणणं होतं, व्यक्तीगत आरोप करत आहेत असं म्हणत होते. पण काल ज्या पद्दतीने खुलासा झाला आहे त्यातून मी सत्य बोलत होतो हे समोर आलं आहे,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
जन्मदाखल्यात खाडाखोड करण्यात आली
“भाजपाकडून हिंदू-मुस्लिम मुद्दा काढला जात होता. वानखेडे हे समीर दाऊद वानखेडे आहेत. जन्मापासून आजपर्यंत ते मुस्लिमच आहेत. त्याचा जन्मदाखला मी प्रसिद्ध केला आहे. यासाठी मला बरेच परिश्रम घ्यावे लागले. त्यांच्या बहिणीच्या दाखल्यात के वानखेडे शब्द वापरला आहे. हे दाऊद वानखेडे ज्यांनी धर्मांतर केल्यानंतर नाव बदललं होतं त्याच्या आधारे जन्मदाखला काढण्यात आला.
नंतर त्याच्यात खाडाखोड करण्यात आली आणि त्यातून बोगसगिरी सुरु झाली आहे. मी अजून काही कागदपत्रं समोर आणणार आहे,” असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…