पुण्यात लोणी काळभोर भागात शुक्रवारी दुपारी उरुळी कांचनच्या तळवडे चौकात भीषण गोळीबार झाला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमीला पुण्याच्या ससून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, हा गोळीबार अप्पा लोंधे टोळी आणि त्याच्यांविरुद्धच्या टोळीमध्ये झाला. त्यामुळे पोलीस याला एक गॅंगवार मानत असून तपास सुरु केला आहे.
या गोळीबारात संतोष जगताप नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत. माहितीनुसार वाळूच्या करारासंदर्भात दोन्ही टोळ्यांमध्ये अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे.
गोळीबारानंतर परिसरात तणाव
लोणी काळभोर पोलिस स्टेशन आणि जवळच्या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील (डीसीपी नम्रता पाटील) देखील घटनास्थळी गेल्या आहेत. टोळीयुद्धातील गोळीबारानंतर परिसरात तणाव वाढला आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…