ताज्याघडामोडी

पती आणि प्रियकराच्या वादात महिलेने गळफास घेत केली आत्महत्या

लग्नानंतर होणाऱ्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर महिलेने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याने पुन्हा संसार करण्याच्या तगादा लावल्यामुळे पती आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेत आत्महत्या केली.

ही घटना 25 ऑगस्टला येरवड्यातील कंजारभाट परिसरात घडली होती. तपासानंतर पोलिसांनी पतीसह एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अर्पणा अनिल अभंगे (वय 22, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अनिल अभंगे याच्यासह एकाविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा आणि अनिल यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून अपर्णाने अनिलपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. 

मात्र, अनिलने पुन्हा अपर्णासोबत संसार करण्याचा तगादा लावला. दुसरीकडे प्रियकर अपर्णसोबत लग्न करण्यासाठी विचारणा करीत होता. त्यामुळे दोघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून 25 ऑगस्टला अपर्णाने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

16 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago