एखाद्या आठवड्या-पंधरवड्यात एखादा तलाठी,मंडल अधिकारी,ग्रामसेवक,कोतवाल यांच्यावर लाच लुचपत विभागाने कारवाई केल्याची बातमी नाही आली कि या राज्यातील जनतेलाही आता काही तरी चुकल्या सारखे वाटत असते, इतकी टोकाची लाचखोरी फेरफार नोंदी आणि सातबाऱ्यावरील वारस नोंदीसाठी या राज्यात होते कि काय असा प्रश्न कायम जनतेला पडलेला असतो.राज्यात लाच लुचपत विभाग वेळोवेळी कारवाई करत असताना देखील लाचखोरीचा हा प्रकार काही थांबताना दिसून येत नाही.एकूणच लाच लुचपत विभागाने सापळा रचून कारवाई करूनही या प्रकरणी प्रत्यक्ष कोर्टखटल्यात निर्दोष सुटण्याचे प्रमाण मोठे असल्याच्या करणाचीच चर्चा होते.
लाच स्वीकारण्यात महिला कर्मचारीही मागे नसल्याचे दिसून येत असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका तक्रारदाराच्या आजोबाच्या निधनानंतर वडील आणी काकाचे नाव सात बारा उताऱ्यावर नोंद धरण्यासाठी तलाठी स्वाती झुरळे यांनी कोतवाल संदीप तांबे यांच्यामार्फत ४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…