ताज्याघडामोडी

आंतरराज्य प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही

जगभरामध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जनजीवन ठप्प झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रसार ओसरताना दिसत आहे. यामुळे काही राज्यातील तसेच जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तसेच देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला जोर आल्याने रुग्ण संख्येतही घट होत आहे. याचदरम्यान आता देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा पर्यटकांना तसेच प्रवाशांसाठी आंतरराज्य प्रवास कताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्यांना प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नसेल असा आदेश केंद्रीय पर्यटन विभागाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. सध्या मुंबई, पुणे, चेन्नई मधून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच कर्नाटक , छत्तीसगढ,गोवा यांसारख्या राज्यातही प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करुनच प्रवेश देण्यात येत असल्याने प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आंतरराज्य प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोरोना काळात राज्य सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असल्यामुळे अनेकांना कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होऊन देखील नियमावलीमुंळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी माहिती पर्यटन व्यावसायिकांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिली. ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना पुन्हा एकदा कोरोना चाचणी म्हणजेच आरटी-पीसीआर टेस्ट करायला न लावता इतर राज्य आपल्या हद्दीत प्रवेश देत आहेत. तसेच काही राज्यात वेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या तसेच पर्यटकांच्या मनात संभ्रमाचे वातारवण निर्माण होत आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना पत्र लिहले आहे की, कोरोना काळात सर्व राज्य सरकारने नागरिकांच्या प्रवेशाबाबत समान नियमावली तयार केली तर पर्यटकांना व प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही. तसेच राज्यांसाठी समान नियम तयार करण्यासाठी केंद्र सरकार, केंद्रीय पर्यटन खाते,नागरी हवाई वाहतूक खाते यांची एक संयुक्त बैठक होणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

8 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago