ताज्याघडामोडी

पैसे नसतानाही रिलायन्स जिओच्या ग्राहकांना करता येणार रिचार्ज

टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने टाळे लावण्याची वेळ आणली आहे. रिलायन्स जिओचे नेटवर्क देशभरात सर्वाधिक लोक वापरत आहेत. सध्या बाजारात काही ठराविक कंपन्या आहेत, ज्या जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्स जिओ याच पार्श्वूभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी योजना घेऊन बाजारात उतरली आहे. त्यानुसार, ग्राहकांना पैसे नसतानाही रिचार्ज करता येणार आहे. या योजनेला ‘इमरजेंसी डेटा लोन’ असे नाव देण्यात आले आहे. माहितीनुसार, काही ग्राहकांना विविध कारणांमुळे त्वरित रिचार्ज करता येत नसल्यामुळे ही योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

अशा जिओ ग्राहकांसाठी ही सुविधा आहे ज्यांचा दैनिक डेटा कोटा संपला आहे. परंतु, ते त्वरित डेटा रीचार्ज करू शकत नाहीत, अशा ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, ग्राहकांना या रिचार्जचे पैसे नंतर द्यावे लागणार आहे. या सुविधेअंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना एक जीबीचे (प्रत्येक) पाच आपत्कालीन डेटा कर्ज पॅक प्रदान करेल. प्रत्येक पॅकची किंमत 11 रुपये असेल. या आपत्कालीन डेटा कर्जाची सुविधा माय जिओ अ‍ॅपद्वारे मिळू शकते. या सुविधेमुळे ग्राहकांना एक सोपा अजून चांगला तोडगा मिळेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago