Categories: Uncategorized

राज्यभरातील पोलीस शिपायांना उपनिरीक्षकापर्यंत मजल मारता येणार

पोलीस दलात भरती झाल्यानंतर अनेकांना वर्षानुवर्ष सेवा करूनही अधिकारी पदापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे शिपायांना किमान पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, त्यानंतर चार ते पाच वर्ष उपनिरीक्षक म्हणून कामाची संधी मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशनानंतर लवकरच मंत्रालयात बैठक घेउन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोलपंपाच्या समारंभात ते बोलत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.वळसे पाटील म्हणाले, पोलीस दलात 30 वर्ष सेवा करूनही अनेकांना तीन पदोन्नती होउन सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त व्हावे लागत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर शिपाई म्हणून रुजू झालेल्यांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे. त्यानंतर त्यांना अधिकारी म्हणून किमान पाच वर्ष काम करण्याची संधी मिळावी. या हेतूने गृहविभागाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago