शेतकऱ्यांच्या परस्पर २२ कोटी ११ लाख कर्ज उचलणाऱ्या ‘मामा’ला आपण आता ‘कामा’ला लावु-अतुल खूपसे

गत अधिवेशनात आपल्या अभ्यासू शैलीत सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठुन सळो की पळो सोडणाऱ्या, सचिन वाझे प्रकरण हातात घेवुन १०० कोटींची वसुलीपर्यंतच्या मुळापर्यंत जावुन सतापयंत्रणेला हादरवुन सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत करमाळ्यातील आमदार संजय शिंदे यांचा कारनामा पोहचला असुन शेतकऱ्यांच्या परस्पर २२ कोटी ११ लाख कर्ज उचलणाऱ्या ‘मामा’ला आपण आता ‘कामा’ला लावु, या संदर्भात उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तारांकित उपस्थित करणार असा शब्द विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघर्ष समितीचे नेते अतुल खुपसे पाटील यांना दिला आहे. 

याचे झाले असे की, करमाळा-माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर पुणे येथील पंजाब नॅशनल बँक, कोथरूड येथुन आमदार संजय शिंदे यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशनने शेतकऱ्यांच्या परस्पर घेतलेल्या २२ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज २०१३ मध्ये घेतले आहे. विशेष म्हणजे तुम्हाला खत देतो म्हणून शेतकऱ्यांचे ७/१२, आधारकार्ड अशी कागदपत्रे गोळा करुन त्याचा गैरवापर करत हे कर्ज काढले असुन २०१७ मध्ये ही कर्जाची खाती नवी-जुणी केली आहेत. 

मात्र गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना पंजाब नॅशनल बॅंकेकडुन अचानक नोटीस आल्याने शेतकरी धास्तावले. पुणे नक्की कुठे आहे..? पंजाब नॅशनल बॅंक कसली असतेय..? हे कधीही माहित नसलेल्या शेतकऱ्यांनी तर डायरेक्ट अंथरुण धरले. पण अशा १५०० शेतकऱ्यांना शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील यांनी आधार दिला. शेतकऱ्यांना ५-२५ हजार कर्ज घ्यावयाचे झाल्यास किलोभर कागदं अन् ५० हेलपाटं मारावयास लावणाऱ्या बॅंकेने केवळ झेरॉक्स कागदांच्या आधारे कर्ज दिलेच कसे..? असा सवाल करुन पंजाब नॅशनल बॅंकेच्या दारात अर्धनग्न होत भिकमांगो आंदोलन केले. शिवाय एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट मुंबई गाठत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन याबाबत निवेदन देवुन सविस्तर चर्चा केली.

दरम्यान या कर्जप्रकरणात पंजाब नॅशनल बॅंकेचे अधिकारी व विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन आमदार संजय शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. शेतकर्‍यांच्या नावावर कर्ज असल्यामुळे ईतर बॅंका त्यांना कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पावले उचलावीत असेही अतुल खुपसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. शिवाय माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेऊन खुपसे पाटील यांनी या संदर्भात घेतली असुन याबाबत देखील चर्चा केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago