जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा करोनाचा विळाखा घट्ट बसलेला बघायला मिळाला आहे. करोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. या जिवघेणा विषाणूवर एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे.
करोना लसीचा एक डोस कोरोना विषाणूपासून होणारे मृत्यू थांबवण्यात ८२ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर करोना लसीचे दोन डोस हे ९५ टक्के प्रभावी असल्याचं समोर आले आहे. याबाबत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीने (ICMR-NIE) संशोधन केले यामधून ही दिलासादायक माहिती समोर आली आहे.
या संशोधनामध्ये लसीकरण झालेल्या आणि लसीकरण न झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूचा अभ्यास करून करोना लसीशी निगडीत मोर्टेलिटी रिस्क मोजण्यात आली. यानुसार करोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या १ हजार जणांच्या मागे १.१७ लोकांचा मृत्यू झाला. तर एक डोस घेतलेल्यांमध्ये ही संख्या ०.२१ आणि दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ही संख्या ०.०६ इतकी होती. आयसीएमआर-एमआयआयचे अध्यक्ष डॉ. मनोहर मुर्हेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…