ताज्याघडामोडी

ओबीसी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनीच  धक्कादायक खुलासा

 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने राज्यात यासंबंधीच्या निकालावरून मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही राजकीय नेत्यांनुसार हा निर्णय फक्त 5 जिल्ह्यात अतिरिक्त ओबीसी आरक्षणाला लागू आहे तर काहींनुसार हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे. मात्र प्रत्यक्षात या निकालाने देशभरातल्या ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. ओबीसी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनीच  धक्कादायक खुलासा करत  हे आरक्षण परत मिळवण्यासाठी आंदोलनासोबतच कायदेशीर लढाई नेमकी कशी पुढे नेता येईल, यावरही नरके यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

विकास गवळी विरूद्ध महाराष्ट्र सरकार निकालाचा नेमका अर्थ समजावून सांगताना प्रा. हरी नरके म्हणाले, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संपूर्ण देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणावर परिणाम करणारा आहे. या निकालामुळे राज्यातील 56 हजार ओबीसी लोकप्रतिनिधी घरी बसणार आहेत. या निर्णयाला वेळीच स्थगिती मिळाली नाहीतर देशभरातील तब्बल 8 लाख ओबीसी पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने घटनेनुसार मिळालेलं ओबीसी आरक्षण रद्द केलं नसलं तरी काही अटींची पूर्तता न केल्याने ते स्थगित केलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सात वर्षापूर्वी राष्ट्रीय स्तरावर केलेल्या जातीनिहाय सर्वेक्षणाचा सर्व डाटा सुप्रीम कोर्टात सादर केला तर ओबीसींना पुन्हा हे राजकीय आरक्षण बहाल होऊ शकते.

पण अजूनही मोदी सरकारने याबाबतच कोणतीच कार्यवाही केलेली नाही. म्हणूनच राज्य सरकारने या ओबीसी आरक्षण स्थगिती आदेशाविरोधात फेरयाचिका दाखल करावी आणि सुप्रीम कोर्टानेच केंद्र सरकारला हा डेटा सादर करण्याचे निर्देश द्यावेत, असा पर्याय प्रा. हरी नरके यांनी राज्य सरकारला सुचवला आहे. पण एवढं करूनही समजा केंद्र सरकारने राज्याला मागासवर्ग आयोगामार्फत हा ओबीसी सर्वेक्षण डाटा उपलब्ध करून दिलाच नाही तर मग राज्य सरकारला पुन्हा नव्याने घरोघरी सर्वेक्षण करून हा जातनिहाय डाटा गोळा करून तो सुप्रीम कोर्टात सादर करावा लागेल. पण ही खूप वेळखाऊ प्रक्रिया असेल. म्हणूनच तोपर्यंत म्हणजेच ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था पुढे ढकलल्या जाव्यात, असाही एक पर्याय प्रा. हरी नरके यांनी राजकीय नेत्यांना सुचवला आहे. त्यामुळे आता राज्यातले सर्वपक्षीय ओबीसी नेते नेमकी काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल. कारण या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही तर ओबीसी राजकारणच धोक्यात येणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

9 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago