लाॅकडाऊन नंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पण कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही.
त्यामुळे प्रशासनाकडून लाॅकडाऊन बद्दल अतिशय सावधगिरीने निर्णय घेण्यात येणार आहे. १ जून नंतर लाॅकडाऊन वाढणार की लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल होणार किंवा त्यामध्ये काही बदल केले जाणार याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी असेल अशा जिल्ह्यामध्ये १ जूननंतर लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येईल.
लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये टप्पटप्प्याने शिथिलता देण्यात येणार असल्याने राज्यातील जनतेला दिलासा मिळण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…