ताज्याघडामोडी

लसीकरण मोहिमेचा फज्जा उडण्यास केंद्र सरकारच जबाबदार, सीरमचे स्पष्टीकरण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करणाऱ्या आणि तिसऱ्या लाटेला कसं थोपवायचं हा विचार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लस मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. लसींचा पुरेसा साठाच नसल्याने तुटपुंज्या प्रमाणात त्या लोकांना देण्यात येत आहेत. 60 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस प्राथमिकतेने मिळावा यासाठी 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण काही ठिकाणी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या सगळ्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण सीरम इन्स्टीट्यूटने दिले आहे.

सीरम इन्स्टीट्यूट ही हिंदुस्थानात दिल्या जात असलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन करते. सीरमने त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की लसींचा साठा उपलब्ध आहे अथवा नाही हे न पाहताच केंद्र सरकारने लसीकरणाला सुरुवात केली.

लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेली नियमावली काय आहे हे न पाहाता केंद्र सरकारने विविध वयोगटातील लोकांच्या लसीकरणास परवानगी दिल्याचंही सीरमने म्हटलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर सीरमचे स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. लसीकरणासंदर्भात एक ई-संम्मेलन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व देशांनी लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या नियमावलीत जी प्राथमिकता ठरवून दिली आहे त्यानुसारच लसीकरण व्हावं असंही सांगण्यात आलं होतं. लसीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी 30 कोटी लोकांना लस टोचण्याचं उद्दीष्ट्य ठरवण्यात आलं होतं. यासाठी 60 कोटी डोसची गरज होती. हे उद्दीष्ट्य गाठण्यापूर्वीच सरकारने 45 तसेच 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला परवानगी देऊन टाकली होती.

अॅस्ट्राझेनेकाने कोरोनावर तयार केलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन सीरम इन्स्टीट्यूट करत आहे. लसींची वाढती मागणी पूर्ण करण्यात सीरम अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यामुळेच या कंपनीने स्पष्टीकरण जाहीर केले आहे. सीरमने लसींची वाढती मागणी लक्षात घेता, विदेशातही लस उत्पादनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही आठवड्यात या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला यांनी जाहीर केले होते की जुलै महिन्यापासून कोव्हीशिल्डचे 10 कोटी डोस तयार केले जातील.

देश सोडून पळालेलो नाही! पूनावाला यांचे स्पष्टीकरण

मी आणि माझा मुलगा अदर देश सोडून पळून गेल्याच्या वावडय़ा उठवल्या जात आहेत. आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱयाच आहेत. प्रत्येक उन्हाळ्यात आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येते. त्यामुळे आम्ही आमचा देश सोडून कुठेही पळालेलो नाही, असे स्पष्टीकरण पूनावाला उद्योगसमूहाचे मालक सायरस पूनावाला यांनी इंग्लंडमध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हे देखील लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आला आहे. देश सोडून गेल्याच्या वावडय़ा उठू लागल्या आहेत. त्यावर सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत अफवांचे खंडन केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago