ताज्याघडामोडी

जेलमधील वाढत्या कोरोना प्रादर्भावाबाबत SC चिंतीत; गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांच्या सोडण्याचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : तुरुंगात कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या संख्येने कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, सर्व राज्यांत स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी केलेल्या सूचनेनुसार कैद्यांच्या सुटकेबाबत निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील कोर्टाच्या आदेशावरून अंतरिम जामिनावर कैद्यांची सुटका झाली होती. त्यानंतर सोडलेले सर्व कैदी परत कारागृहात परतले आहेत. कैदी आणि कर्मचार्‍यांना जास्त गर्दी असलेल्या कारागृहात मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. काल ही बाब सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांच्यासमोर ठेवण्यात आली.

गेल्या वर्षी 23 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीला सर्व राज्यातील कैद्यांच्या सुटकेबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने म्हटले होते की दोषी ठरवण्यात आलेल्या आणि विचाराधीन कैद्यांना काही काळासाठी सुटका करता येईल हे समितीने ठरवावे. कोर्टाने असे सुचवले की 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पॅरोलवर कैद्यांची सुटका करणे किंवा किरकोळ गुन्ह्यांमध्ये खटला सुरु असलेल्या कैद्यांना परोलवर सोडणे योग्य राहिल. या आदेशानंतर कोर्टाने अनेक महिने कैद्यांच्या सुटकेबाबत राज्यांकडून माहिती घेतली.

शुक्रवारी हा विषय बराच काळानंतर न्यायालयात उपस्थित झाला. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर जवळपास सर्व कैदी तुरुंगात परत आले आहेत, अशी माहिती सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला वरिष्ठ वकील कॉलिन गोंजाल्विस यांनी दिली. यावेळी बहुतेक तुरूंगांमध्ये गर्दी अधिक आहे. यासंदर्भात कोर्टाने त्वरित आदेश द्यावा. उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यात वेळ वाया घालवावा यापेक्षा गेल्या वर्षी तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांना यावर्षीसुद्धा सोडण्याचे न्यायालयाने आदेश द्यावे, हे चांगले होईल. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश रमना यांनी आश्वासन दिले की ते उच्च न्यायालयाच्या सर्व मुख्य न्यायाधीशांशीही या विषयावर चर्चा करतील जेणेकरून प्रक्रिया सुलभ होईल.

आज सर्वोच्च न्यायालयाने आपल्या संकेतस्थळावर हा आदेश अपलोड केला आहे. त्यात म्हटले आहे की राज्यांमध्ये स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने गेल्या वर्षी दिलेल्या निर्देशांचे पालन केले पाहिजे. गेल्या वर्षी सोडण्यात आलेल्या कैद्यांना पुन्हा अंतरिम सुटका करण्यात यावी. गेल्या वर्षी पॅरोल मिळालेल्या कैद्यांना 90 दिवसांसाठी सुटका करावी. याक्षणी अटक अत्यंत महत्वाच्या घटनांमध्येच करावी.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago