अमरावती : बांधकामासाठी लागणार्या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना गोपालनगरजवळील स्वागतम कॉलनीत गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि वैभव तायडे याची मानलेली बहीण यांच्यात बांधकामाच्या वाळुवरुन वाद होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी तायडे रात्री आरोपींकडे गेला होता.
त्यावेळी झालेल्या भांडणात आरोपींनी सेंट्रींग राफटरणे वैभवच्या चेहर्यावर मारुन वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैभवला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टर तपासणीपूर्वी त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच राजा पेठ पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…