राज्यातील रोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या,ऑक्सिजन अभावी तडफडून मरत असलेले रुग्ण,रेमिडिसीवीर चा तुडवडा आणि केंद्राचे असहकार्य यामुळे राज्यातील परिस्थिती आता हाताबाहेर चालली असल्याचे दिसून येत असुन गेल्या वर्षभरापासून अतिशय धैर्याने परिस्थिती हाताळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केंद्राला आर्त विनवणी केली असून तुमच्या पाया पडतो,हात जोडतो पण कबूल केल्याप्रमाणे २६ हजार रेमिडीसीवर इंजेक्शन तातडीने द्या अशी मागणी केली आहे.
राज्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन,रेमिडिसीवीर आणि लसींचे नियंत्रण अजूनही पूर्णपणे केंद्राच्या हातात आहे.आम्ही वारंवार केंद्राकडे पाठपुरावा करीत आहोत.राज्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देत आहोत पण केंद्राकडून याला फारसा प्रतिसाद मिळत नाहीय.गेल्या अनेक दिवसापासून आम्ही केंद्राकडे ६० हजार रेमिडिसीवीर ची मागणी करीत आहोत,त्यापैकी केवळ २६ हजार इंजेक्शन देण्याची तयारी केंद्राने दाखविली.तेही वेळेवर मिळत नाहीत.वास्तविक पाहता राज्यातील गंभीर रुग्णाची संख्या लक्षात घेता ६० हजार रेमिडिसीवीर तातडीने मिळणे गरजेचे असल्याचे राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…