महाराष्ट्राला कोविड लसीचे 19 लाख 50 हजार पुढील दोन दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी दिली. मात्र, महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता लसीचा योग्य वापर करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली.पुण्याहून भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला किमान आठवडाभर पुरेल एवढा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे यांच्या सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर चुकीचे आरोप करू नये. केंद्राकडून लवकरच 19 लाख 50 हजार लसीचा पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने या लसीचा वापर योग्यरितीने करावा. करोनाचा काळ हा राजकारण करण्यासाठी नाही. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून मुकाबला केला पाहिजे. आम्ही सरकारला सहकार्य करीत आहोत. पण लोकांचे लक्ष वाझे प्रकरणावरून वळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.बापट म्हणाले, पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. मात्र, शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख लसीची गरज आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…