मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला होता. परंतु, रुग्णवाढ अशीच झपाट्याने वाढत राहिली तर डॉक्टर आणि नर्सेस कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचं सरकारने निश्चित केल्याचं समजतं.
करोनाची साखळी तोडण्यासाठी ठोस उपाय मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजारहून अधिक रुग्ण आढळले. अशीच वाढ कायम राहिली तर १० ते १५ दिवसांत सर्व बेड्स आणि संसाधनं अपुरी पडू लागतील, असं स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. तसेच तज्ज्ञांशी बोलून लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ असही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या एकंदरीत इशाऱ्यावरून राज्यात लॉकडाऊन होणार हे निश्चित मानलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…