पंढरपूर तालुक्यातील गेल्यावर्षी भीमा नदीला आलेल्या महापुराने सुमारे 700 नुकसानग्रस्त शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वंचित आहेत व यावर्षी ही अवकाळी व महापुरामुळे नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी पंचनामे होऊन सुद्धा वंचित आहेत पंढरपूर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार झालेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलआहे एकीकडे निधी दिला म्हणून सरकार पाठ थोपटून घेत असताना पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मात्र गेले अनेक दिवस वंचित आहेत आज निधी जमा होईल उद्या निधी जमा होईल या आशेने बँकेकडे हेलपाटे मारत आहेत त्यांची परवड होत आहे यामुळे सरकार विरोधी वातावरण निर्माण झालेले आहे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने हा निधी जमा करावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आज पंढरपूरचे तहसीलदार विवेक साळुंके यांना दिला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर तालुकाध्यक्ष तानाजी सोनवणे व शेतकरी बांधव उपस्थित होते
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…