बीड : एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जातेय. बीड तालुक्याच्या पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी घडला.
याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय. याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही इन्फंट इंडिया संस्थेनं दिलाय. दरम्यान मुलांना हाकललं नसल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक कांतीलाल लाड यांनी दिलीय.
पालीमधल्या 6वी ते दहावीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत याच प्रकल्पातले 28 विद्यार्थी शिक्षण घेतायत. इन्फंट प्रकल्पात पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या मुलांनी या शाळेत प्रवेश घेतलेला नाही.
इन्फंटचे शिक्षक जावेद हेच या मुलांना घेऊन परत प्रकल्पावर गेले.मुलांना आम्ही हाकललं नाही अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी दिलीय.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…