ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरासह उपनगरातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान  करणाऱ्या मुख्याधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची भाजपाची मागणी

पंढरपूर – पंढरपूर शहरातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब यांनी पंढरपूर शहर व उपनगरातील अनेक छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना न देता अचानकपणे जेसीबीच्या सहाय्याने अनेकांच्या व्यावसायाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असून त्यामुळे त्यांच्या कारवाईबद्दल अनेकांतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. मुख्याधिकारी मानोरकर यांनी केवळ उसने आवसान आणून हातावरचे पोट असणाऱ्यांना उघड्यावर आणलेले आहे. आपलं ठेवलं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून अशा हुकुमशाही पध्दतीचा कारभार सध्या मुख्याधिकारी करताना दिसत आहेत, त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हा चिटणीस दत्तासिंह राजपुत व पंढरपूर शहरचे मा.सरचिटणीस वालचंद जामदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री म.रा., विरोधी पक्षनेते विधान सभा, विरोधी पक्षनेते विधानसभा व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.
       वास्तविक पाहता पंढरपूर शहर परिसर व उपनगरातील व्यावसायिक, हातगाडेवाले, टपरीवाले हे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेची दररोजची हातगाडा फी भरून व्यवसाय करीत आहेत. अनेक वर्षांपासून ते या व्यवसायावरच आपला व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतू आज अचानकपणे कोणतीही पूर्व सूचना न देता पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोा यांनी मनमानी करत आपल्या प्रचंड लवाजम्यासह जुलमाने कारवाई केल्याने अशा अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आणलेली आहे. गोरगरीबांच्या व्यावसायाच्या मालमत्तेचे जसे की टपरी, हातगाडा, काहींनी अडोशासाठी केलेली घरे व पानसरे यांची प्रचंड प्रमाणात तोडफोड करून त्यांची रोजीरोटी हिरावरून घेतलेली आहे.
        पंढरपूर म्हटले की चार वाऱ्यांवर जगणारे गाव म्हणून ओळखले जाते यंदा मात्र कोरोना महामारीमुळे कोणतीही वारी भरलेली नाही. अगोदरच गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या लोकांनी कसे तरी उसने आवसान आणत , उसनवारी करत आपले व्यवसाय सुरू करून आपले  व आपल्या कुटूंबियांचे उदरनिवार्ह करीत होते. आधीच व्यवसाय नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेकांना या कारवाईमुळे प्रचंड प्रमाणात धक्का बसल्याचे दिसून येते. अशातच अचानकपणे मुख्याधिकारी मानोरकरांनी प्रचंड दहशत निर्माण करत जेसीबीच्या सहाय्याने संबंधित छोट्या व्यावसायिकांचे तोडफोड नुकसान करत कंबरडे मोडले आहे, अशी मनमानी करून जनसामान्यांच्या गोरगरीबांच्या अन्नात माती कालवणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व नुकसान केलेल्या व्यावसायिकांनी नुकसान भरपाई मिळावी. तसे न झाल्यास प्रचंड जनप्रकोपाला सामोरे जावे लागेल व यापुढे होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी आपणच जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी,असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 days ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

6 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

2 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 month ago