ताज्याघडामोडी

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा स्वेरी मध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

पंढरपूरः आयुष्यात उत्तमरित्या करीअर करायचे असेल तर शिक्षकांनी आणि मोठ्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे हे फायदेशीर ठरते. आपल्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचे ऋण आपण आयुष्यभर जपले पाहिजेत. पतंग कितीही उंच उडवा परंतु त्यांची दोरी आपल्या हातामध्ये असते. त्याप्रमाणे जगात ज्ञान प्रचंड आहे परंतु मेंदूचा वापर करून फायद्याचे तेवढे ज्ञान घ्यायचे असते. जो मेंदूचा वापर अधिक करतो तोच हुशार बनतो. यासाठी स्वतःभोवती घडणाऱ्या गोष्टी आपण चिकित्सकपणे तपासल्या पाहिजेत. आपले व्यक्तिमत्व घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. आपले विचारवर्तनवागणेबोलणे हे सर्व आपल्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येत असते. यासाठी सत्यअहिंसाप्रेमन्यायमानवता सार्वजनिक मूल्ये समजून घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. ऑनलाइन मिळते ती माहिती असते पण ज्ञान हे वर्गात शिक्षकांकडूनच मिळत असते. जे विद्यार्थी नम्रतेने राहतात ते विद्यार्थी आयुष्यात खूप मोठे होतात. आपल्याकडे कितीही ज्ञान असोजर नम्रताच अंगी नसेल तर त्या अथांग ज्ञानाचा उपयोग नाही. नम्रता ही शिक्षकांकडून मिळत असते. एकूणच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

       गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य खुल्या रंगमंचामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३६वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजिलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे होते. महाराष्ट्र गीत आणि स्वेरीच्या सुमधुर गीताने व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. संदेश फलकावरून संचालक डॉ. काळवणे यांनी मेहनत करायश तुमचेच आहे’ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून शिक्षकांचे समाजाच्या प्रगतीमध्ये असणारे योगदान स्पष्ट करताना म्हणाले की, ‘विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसून तो शिक्षकांच्या भूमिकेत देखील आहे. त्यामुळे त्याला आदराचे स्थान दिले जाते. विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना भावनीकतेला थारा देवू नये तसेच विद्यार्थी व शिक्षक यांचे आपसातील संबंध हे आदराचे असावे’ असे सांगून त्यांनी विद्यार्थी दशेतील अनुभव सांगितले. पुढे बोलताना संचालक डॉ. काळवणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतो त्यामुळे आपल्या विकासाला अडथळा येतो यासाठी न्यूनगंड बाजूला झटकून कार्य केले पाहिजे. जर आपले मन परिवर्तन करायचे असेल तर वाचन आवश्यक आहे. कारण वाचनलेखन आणि भाषण ही मुलभूत कौशल्ये आपल्यात असणे आवश्यक आहे आणि ही  कौशल्ये  विकसित करण्याचे काम वाचन’ संस्कृती करते. यासाठी मनात जे आहे ते कागदावर उतरवले पाहिजेत्यातून माणूस हा भविष्यात भारताचा सक्षम नागरिक बनतो.‘ असे सांगून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील थोर महात्म्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीही शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना समजून घेणे ही अवघड कला शिक्षकांकडे असते. शिक्षकांना वेळ प्रसंगी कठोर बनावे लागते. यामागचा हेतू एवढाच की विद्यार्थी शिकून शहाणा झाला पाहिजे. यासाठी शिक्षक हा स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्याचा वापर विद्यार्थी घडविण्यासाठी करतो.’ असे सांगून त्यांनी बाबा आमटेसंत गाडगेबाबा अशा अनेक संताच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी पीएच. डी. प्राप्त केल्याबद्धल एम.बी.ए.च्या डॉ. मिनल भोरे व चारही महाविद्यालयांतील प्राचार्यांचा व प्राध्यापकांचा शिक्षक दिना’ निमित्त पाहुण्यांच्या व  विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वेणुनगर येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे व सिद्धेश्वर बंडगरडॉ. गणेश संकपाळसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे,  युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगेस्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवारसंस्थेअंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळबी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मणियारडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस.व्ही.मांडवेअभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारसर्व अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी प्रतिनिधी राधिका पाटीलगायत्री जाधवसानिका भांगेविवेक चव्हाणसुशांत शेटेविद्यार्थी व पालक उपस्थित होते. सृष्टी लामगुंडे व मानसी लोंढे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी आभार मानले.

 

 चौकट:

स्वेरीसारखे बहारदार सूत्रसंचालन मी कुठेच पाहिले नाही. असे सांगून प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांच्या सूत्रसंचालनाचे प्रमुख  पाहुण्यांनी मनभरून कौतुक केले तसेच मोबाईलचा वापर हे नुसते वेड नसून एक आजार आहे. यासाठी त्याचा गरजेपुरताच वापर करावा.’ असे आवाहनही संचालक डॉ. काळवणे यांनी केले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago