ताज्याघडामोडी

जालन्यातील गावात झळकला बॅनर, ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी

जालना : मराठा आरक्षणाच्या उपोषणाचं केंद्र बनलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक वातावरण बिघडल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला होता. मराठा आरक्षणाच्या उपोषणामुळे आणि मनोज जरांगेंमुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं होतं. मात्र, जरांगे यांनी त्याच गावात मंडप टाकून उपोषण केलं. त्यानंतर, जरांगेंच्या मागणीला विरोध करत ओबीसी समाजाच्या आरक्षण हक्कासाठी लक्ष्मण हाके   यांनी जालना जिल्ह्यातूनच उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणालाही राज्यभरातून ओबीसी समाजाने पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. जरांगे यांच्या मागणीवर सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते. अखेर, सरकारसोबत हाकेंच्या शिष्टमंडळाची व ओबीसी नेत्यांची बैठक झाल्यानंतर हाके यांनीही आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या उपोषणाचा परिणाम राज्यातील सामाजिक सलोख्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. गावागावात मराठा आणि ओबीसी असा सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्हीही नेते मराठा आणि ओबीसी हे भाऊ-भाऊ असल्याचं सांगतात. मात्र, गावपातळीवर याची धग पोहोचल्याचं दिसून येत आहे.

लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात या आशयाचा फलक लावला आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता सामाजिक वातावरण बिघडत चालल्याचं दिसून येत आहे. जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशाराही या फलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या फलकाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोन समाजात तेढ निर्माण करणारा हा बॅनर असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासनाकडून हा बॅनर हटवला जाऊन कारवाई केली जाईल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago