Categories: Uncategorized

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प सोलापूर जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाने केला. वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे झाला.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे, श्रावण जंगम, देवणीकर, महादेव न्हावकर, राहुल पावले, मंचाचे शहर संयोजक चिदानंद मुस्तारे होते.

मेळाव्याच्या प्रारंभी आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले. तसेच हुबळी येथील कॉलेजमध्ये भरदिवसा घडलेल्या नेहा हिरेमठ हिच्या  हत्याकांडाचा धिक्कार करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

देशहिताच्या तसेच राष्ट्रीय मुद्द्यांवर वीरशैव लिंगायत समाजाने आगामी सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मार्गदर्शक उद्योजक अण्णाराय बिरादार यांनी केले. आगामी लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय मुद्द्यावरून राष्ट्रीय मुद्याकडे नेत १०० टक्के मतदान घडवून एकूण मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता शहर व जिल्ह्यात विविध स्तरावर बैठका घेऊन प्रबोधन व जनसंपर्क करण्याचे आवाहन श्री. बिरादार यांनी यावेळी केले.

शत प्रतिशत मतदान प्रत्यक्ष घडवून आणण्याकरिता विविध स्तरावर बैठका घेण्याची रचना प्रांत मिडिया संयोजक राहुल पावले यांनी उपस्थित समाज बांधवांच्या समोर मांडली. एक भारत श्रेष्ठ भारत, राष्ट्राचा प्रगतीसाठी, विश्वभरात भारतमातेचा गौरव तसेच सुरक्षित भारताकरीता १०० टक्के मतदान करण्यासाठी उपस्थितांना दानिश तिमशेट्टी यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी राष्ट्रीय जंगम समाजाचे युवक अध्यक्ष श्रावण जंगम यांनी या संकल्पास पाठींबा देत सक्रियपणे कार्य करण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्यात वीरशैव महासभेच्या महिला प्रमुख पुष्पाताई गुंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. महादेव न्हावकर यांनी प्रास्ताविक तर हिंदु वीरशैव लिंगायत मंचाचे शहर संयोजक चिदानंद मुस्तारे यांनी सूत्रसंचालन केले.

या मेळाव्यास समाजातील राजश्री देसाई, शोभा नष्टे, विद्या जोडभावी, मीना थोबडे, निर्मला किणगी, रंजिता चाकोते, बसवराज इटकळे, जगदीश पाटील, सचिन कुलकर्णी, सागर अतनुरे, चन्नवीर चिट्टे, मल्लेश कावळे, सिद्धरामय्या स्वामी, सुनील रिक्के, सचिन विभूते, रवींद्र बसवंती, अशोक स्वामी, अनिल बिराजदार, केदार भोगडे, गुरुराज चरंतीमठ, हृषीकेश कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी आदी समाजबांधव उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 month ago