रिझर्व्ह बँकेनं पेटीएमवर नुकत्याच घातलेल्या निर्बंधांमुळं, देशभरातील पेटीएम वापरणारे व्यापारी त्यांच्या पैशांबाबत अत्यंत चिंतित आहेत. त्याअंतर्गत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेनं देशभरातील पेटीएम वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिलाय. पेटीएम वापरकर्त्यांनी त्यांच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी आणि कोणतंही नुकसान न होता त्यांचे आर्थिक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असं म्हटलंय.
सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, “लहान व्यापारी, विक्रेते, फेरीवाले आणि महिलांसह मोठ्या संख्येनं लोक पेटीएमद्वारे व्यवहार करत आहेत आणि आरबीआयच्या बंदीमुळं या लोकांना आर्थिक अडचणी येऊ शकतात.”
पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घालण्याचं मुख्य कारण म्हणजे योग्य केवायसी न पाहता तयार केलेली कोट्यवधी खाती आहेत. या खात्यांतर्गत केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. इतकंच नव्हे तर ओळखीची खातरजमा न करता कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही करण्यात आले. त्यामुळं मनी लाँड्रिंगची शक्यता बळावल्याचं भरतिया आणि खंडेलवाल म्हणाले.
आरबीआयनं निर्बंध लादण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पेटीएम पेमेंट बँकेच्या अंतर्गत एक हजाराहून अधिक वापरकर्त्यांची खाती एका पॅन कार्डशी जोडलेली होती. याशिवाय आरबीआय आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचं पालन करत नसल्याचं आढळून आलं. जर निधीच्या गैरवापराचं कोणतेही पुरावे आढळले तर ईडीनं पेटीएम पेमेंट बँकेची चौकशी करावी, असं व्यापारी संघटनेचं मत आहे.
आरबीआयनं पेटीएमवर नुकत्याच घातलेल्या निर्बंधांमुळं या प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केलेल्या आर्थिक सेवांच्या सुरक्षा आणि जारी करण्याच्या संदर्भात समस्या निर्माण झाल्या आहेत. भरतिया आणि खंडेलवाल यांनी व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे पेटीएममधून ताबडतोब काढून घेण्याचा सल्ला दिलाय. तसंच त्यांच्या पैशाची जोखीम कमी करण्यासाठी इतर पेमेंट्स ॲप्सवर स्विच करावं असाही सल्ला दिलाय. व्यापारी व्यवहारांची सुरक्षा आणि आर्थिक मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, दोन्ही व्यापारी नेत्यांनी पेटीएम वापरकर्त्यांना थेट यूपीआयद्वारे व्यवहार करण्याचा सल्ला दिलाय.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…