छठपूजा करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर बेछूट गोळीबार करण्यात आला. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली. छठ घाटावरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
धक्कादायक घटना पंजाबी मोहल्लामध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली. या हल्ल्यात 6 जण जखमी झाले आहेत. त्यांना बेगुसराय इथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तीन गंभीर जखमींना पाटणा पीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आलं आहे.
लखीसराय एसपीच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याचं सांगितलं जात आहे. आशीष चौधरी नावाचा युवक त्याच्याच घरासमोर राहणाऱ्या मुलीवर प्रेम करत होता आणि तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट त्याने धरला होता.
आशीषशी लग्न करुन देण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याचा राग येऊन आज त्याने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला. काही दिवसांपूर्वीही आशिष चौधरीचा या कुटुंबाशी वाद झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी गोळीबार केल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…