एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्यांवर आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत एसपींकडे तक्रार केली असून आरोपी सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल घेत एसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही घटना घडली आहे.
हे प्रकरण नरैनी कोतवालीच्या मोतियारी गावातील आहे. मृत महिलेचे वडील विनोद तिवारी यांनी सांगितले की, २०१७ मध्ये त्यांनी मोतियारी गावात त्यांच्या मुलीचे लग्न केले होते. लग्नानंतर सासरचे लोक दोन लाख रुपये आणि दुचाकीची मागणी करत होते. मुलगी गरोदर होती.
सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करत वडिलांनी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने माझ्या मुलीची हत्या केल्याचं म्हटलं आहे. जेव्हा तिचे सासरचे लोक तिला त्रास देत असत तेव्हा ती आम्हाला फोनवर सर्व काही सांगायची. पप्पा तुम्ही पोलिसात तक्रार करू नका, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, असं म्हणून ती आम्हाला तक्रार करु द्यायची नाही. मुलगी म्हणाली, पप्पा तुम्ही काळजी करू नका आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.
वडिलांनी पुढे सांगितले की, मला ५ मुली आहेत. मी शेती करून उदरनिर्वाह करतो. एक-एक पैसा जोडून मी मुलीचे लग्न लावून दिले. पण, हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी मुलीची हत्या केली. मृत महिलेच्या मोठ्या बहिणीने सासरच्या लोकांवर हुंड्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…