बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेड अलर्ट, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे.
मुंबईजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे आज मुंबई, ठाण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस खंडाळा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, वाई आणि मुळशी येथे जोरदार पाऊस पडणार असून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे ओलांडताना खबरदारी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…