गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून मोफत धान्य देण्यात येते. प्राधान्य गटासाठी २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जात होते. मात्र, या निर्णयात आता बदल करत १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे जिल्हा पुरवठा शाखेतर्फे सांगण्यात आले.
शासनाकडून तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि २ रुपये किलो दराने गहू दिला जात होता. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या योजनेत बदल करीत जानेवारीपासून लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे. अंत्योदय गटातील नागरिकांना एका शिधापत्रिकेवर ३५ किलो धान्य, तर प्राधान्य गटातील नागरिकांना प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे धान्य वितरित केले जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.
शहरात प्राधान्य गटात मोडणारे ३ लाख ३१ हजार ७७५ रेशनकार्डधारक आहेत. कुटुंबातील सदस्यांची संख्या १४ लाख ११ हजार २० आहे. ग्रामीण भागात प्राधान्य गटातील ३ लाख १५ हजार २११ रेशनकार्ड असून सदस्यांची संख्या १३ लाख ३६ हजार ४१४ आहे. या नागरिकांना शनिवारपासून केवळ एकच किलो गहू मिळणार आहेत. अंत्योदय गटातील नागरिकांना मात्र पूर्वीप्रमाणेच प्रती रेशनकार्ड ३५ किलो धान्य देण्यात येईल. यात १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ मिळणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी सांगितले. जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या १ लाख २१ हजार ८३१ आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…