पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका वृद्ध दाम्पत्याने बुधवार (दि २१) रोजी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आपला मृत्यू झाल्यानंतर इतरांना कोणताही त्रास नको यासाठी आत्महत्या करण्यापूर्वी चितेसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी एका शेतात गोळा करून ठेवले. त्यानंतर घरी येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील वेतवडे या गावात महादेव दादु पाटील (वय-७५ ) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील ( वय-७० ) राहतात. या वृद्ध दाम्पत्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने वयाच्या सत्तर-पंचाहत्तरीत दिवसभर शेतात ते राबत असत.
या वृद्ध दाम्पत्याचे काम पाहून सर्व गावकरी आदराने आणि लाडाने त्यांची गरीब व स्वाभिमानी जोडपे अशी प्रशंसा करत. सर्व गावकरी दोघांना आदराने आण्णा, द्वारकाआई असं म्हणत असत. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार होता.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…