पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका वृद्ध दाम्पत्याने बुधवार (दि २१) रोजी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आपला मृत्यू झाल्यानंतर इतरांना कोणताही त्रास नको यासाठी आत्महत्या करण्यापूर्वी चितेसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी एका शेतात गोळा करून ठेवले. त्यानंतर घरी येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील वेतवडे या गावात महादेव दादु पाटील (वय-७५ ) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील ( वय-७० ) राहतात. या वृद्ध दाम्पत्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने वयाच्या सत्तर-पंचाहत्तरीत दिवसभर शेतात ते राबत असत.
या वृद्ध दाम्पत्याचे काम पाहून सर्व गावकरी आदराने आणि लाडाने त्यांची गरीब व स्वाभिमानी जोडपे अशी प्रशंसा करत. सर्व गावकरी दोघांना आदराने आण्णा, द्वारकाआई असं म्हणत असत. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार होता.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…