निफाड तालुक्यात असलेल्या पालखेड मिरचीचे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तरुण शेतकरी मनोज भगीरथ जगझाप (वय ३७) याने आर्थिक विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
द्राक्षबागेसह व इतर पिकांच्या कोसळलेल्या भावामुळे आर्थिक देवाणघेवाण पूर्ण होऊ शकली नाही. त्यात एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीसाठी तगादे वाढल्याने त्यांनी हात उसने व नातेवाईंकाकडून पैसे घेऊन बँकेचे कर्ज नुकतेच भरले होते. पुन्हा याच बँकेकडून कर्ज घेऊन ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांचे परत देऊ असे नियोजन असताना या शेतकऱ्याला बँकेने कर्ज देण्याचा नकार दिल्याने या शेतकऱ्याने धक्कादायक पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. कर्ज नाकारल्याचा धक्का मनोजला सहन झाला नाही.
दरम्यान, ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांची परतफेड कशी करायची या विवंचनेत असताना काल दिनांक १६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास आपला मोबाईल, महत्वाची कागदपत्रे असलेले पाकिट विहिरीतील पेटीत ठेवले व पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घरातील सदस्यांनी सगळीकडे शोधाशोध घेऊनही संपर्क होत नव्हता. काही वेळातच विहिरीलगत चपला दिसून आल्या.
विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता मनोजचा मृतदेह विहिरीत आढळून आला. तो काढून पिंपळगावाच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…