मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दावे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर महाराष्ट्रात विविध ठिकाणी लागले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर थेट पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार असं जाहीर केलं होतं. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी “2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार” या जयंत पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो.” महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास फायदा होईल का? असं विचारलं असता अजित पवार पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्यास निश्चित फायदा होईल, हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाही, तीन पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर ज्या उद्देशाने भाजपाने एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन सरकार अस्तित्वात आणलं, याला दहा महिने पूर्ण झाले, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे जे आमदार गेले, त्यांच्या मतदारसंघातील मार्केट कमिटीच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याचं पाहायला मिळालं, असंही अजित पवार पुढे म्हणाले.
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…
रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१…