प्रेमप्रकरणातून अनेकदा विवाहित महिला किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला सोडण्याचा निर्णय घेतात. पण, बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील प्रेमप्रकरणाची जी घटना समोर आली आहे ती वाचून तुम्ही हैराण व्हाल. येथे पत्नीने आपल्या पतीला धोका दिला म्हणून पतीने बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीशी लग्न केले ज्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते.
खगरियाच्या चौथम ब्लॉकमधील हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजचे लग्न पसरहा गावात रुबी देवीसोबत २००९ मध्ये झाले होते. दोघांनाही चार मुलं होती. मात्र, रुबी देवीचे पसरहा गावात राहणाऱ्या मुकेशसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मुकेशचंही लग्न झालेलं होतं. त्यालाही दोन मुलं होती. पण, या दोघांनी कसलाही विचार न करता फेब्रुवारी २०२२ मध्ये पळून जाऊन लग्न केलं. इतकंच नाही तर ते आपल्या दोन मुली आणि एका मुलाला सोबत घेऊन गावातून फरार झाले.
नीरजला त्याची पत्नी प्रियकर मुकेशसोबत पळून गेल्याचे समजताच नीरजने मुकेशविरुद्ध पसरहा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नीरजने सांगितले की, अनेकवेळा गावात पंचायतही झाली पण मुकेश काही ऐकला नाही. मुकेश नीरजची बायको रुबीसोबत कधी या गावात तर कधी त्या गावात राहत होता. मग नीरजनेही बदला घेण्याचे ठरवलं. नीरजने आरोपी मुकेशच्या पत्नीसोबत पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे या दोघांच्याही पत्नीचे नाव रुबी आहे.
मुकेशचा विवाह अमानी गावातील रुबी देवीसोबत झाला होता. मुकेश त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून नीरजच्या पत्नीसोबत राहत होता. मुकेशचा बदला घेण्यासाठी नीरज मुकेशची पत्नी रुबीला फोन केला. नीरजने तिला सांगितलं की आपल्या नवऱ्याला समजावं. या संदर्भात नीरज आणि मुकेशची पत्नी रुबी यांच्यात अनेकदा फोनवर संवाद होऊ लागला. संवादाचे प्रेमात रुपांतर कधी झाले हे नीरज किंवा मुकेशची पत्नी रुबीला कळाले नाही. दोघांनाही आधाराची गरज होती. अशा परिस्थितीत दोघांनी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी गावातून पळून जाऊन मंदिरात लग्न केले. या लग्नाची चर्चा आता अख्ख्या गावात होऊ लागली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…