लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. मात्र लग्नानंतर तीन दिवसातच एका व्यक्तीने जे काही केलं ते जाणून तुम्हीही हादराल.घटना छत्तीसगडच्या रायपूरमधून समोर आली आहे. यात एकाच खोलीत नवरदेव आणि नवरीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. यात रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी खोलीत गेलेल्या नवरदेवाने आधी आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. ही घटना रायपूरच्या टिकरापारा परिसरातील आहे.
रायपूरच्या टिकरापारा भागात एका खोलीत वधू-वरांचे मृतदेह सापडले आहेत. 19 फेब्रुवारीला दोघांचं लग्न झालं होतं, त्यानंतर दोघंही 21 फेब्रुवारीला रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी रूममध्ये गेले. दरम्यान, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला, त्यानंतर अस्लमने आपल्या कहकाशा बानोवर चाकूने वार केले.
दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी नगर नई बस्ती येथील रहिवासी असलमने 19 फेब्रुवारीला राजातालाब येथील रहिवासी कहकशा बानोसोबत लग्न केलं होतं. 21 फेब्रुवारीला दोघांचं लग्नाचं रिसेप्शन होतं.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…