देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी अरमाळ धरणासाठी गावातील भास्कर वालू राठोड यांची शेत जमीन १९९४ मध्ये संपादित करण्यात आली. मात्र त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. उत्पन्नाचे साधन असलेली एकमेव जमीन धरणाकरिता अधिग्रहित करण्यात आली. मात्र त्यांचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने न्याय मागत २००८ साली दिवाणी न्यायालयात धाव घेतली.
अनेक वर्षांपासून शेतकऱ्याने प्रशासन विरोधात न्यायालय लढाई लढली. अखेर शेतकऱ्यांच्या बाजूने दिवाणी जिल्हास्तरावर न्यायालयाने निकाल दिला शेतकऱ्याला १८ लाख आणि सहा लाख अशा दोन वेगवेगळ्या स्वरुपात मोबदल्याची रक्कम द्यावी असे आदेश पाटबंधारे विभागाला न्यायालयाने दिले. परंतु पाटबंधारे विभागाने या शेतकऱ्याला मोबदला दिलाच नाही.
मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्याने वेळोवेळी चकरा मारल्या. मात्र त्यांच्याविषयी अधिकाऱ्यांनी काहीच दखल घेतली नाही. दरम्यान दिवाणी जिल्हा स्तरावर न्यायालयाचे न्यायाधीश हबीरे यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार न्यायालयीन कर्मचाऱ्यासह शेतकरी खुर्ची जप्त करण्यासाठी कार्यालयात गेला. ही कारवाई सुरू असताना कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत काही दिवसांचा अवधी मागितला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…