औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने मृत पत्नीसोबत 500 किलोमीटरचा ट्रेनने प्रवास केल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे या घटनेची सहप्रवाशांना देखील कल्पना नव्हती.पतीला सुद्धा पत्नीची मृत्यू झाल्याची माहिती नव्हती. मात्र नंतर ट्रेनमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर या घटनेचा उलगडा झाला.
पती आपल्या आजारी पत्नीला घेऊन लुधियानाला उपचारासाठी जात होता. यावेळी ट्रेनमध्ये काही अंतरावर पोहोचताच तिची तबीयत आणखीणच खालावली होती. या दरम्यानचं तिने पतीच्या मांडीवरच प्राण सोडला होता. मात्र याची पतीसह सहप्रवाशांना कल्पनाच नव्हती. पतीला ती झोपली असल्याचे वाटल्याने त्याने तिच्यावर चादर ओढली होती. असा साधारण त्याने 500 किमी अंतर पार केले होते.
टीसी चढला ट्रेनमध्ये
प्रवासादरम्यान गाडी महत्त्वाच्या स्थानकात पोहोचताच टीसीने ट्रेनमध्ये प्रवेश केला होता. यावेळी टीसीने सर्व प्रवाशांची तिकीट तपासण्यास सुरुवात केली. तिकीट चेक करता करता टीसी त्या पतीजवळ पोहोचला होता. टीसीने पतीला तिकीट विचारले व पतीला उठवण्यास सांगितले. यावेळेस पतीला जाग करताना त्याला पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…