जयंत पाटील यांचं मोठं विधान
आम्ही पुन्हा येणार’ असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( jayant patil ) यांनी केला आहे. तसेच, कधी येणार याचा मुहूर्त पण थोड्या दिवसात सांगू. देशात आता निवडून आलेल्यांना गोळा करून त्यांची किंमत मोजायची आणि सत्तेची अशी फॅशन सुरू झाल्याची टीकाही पाटील यांनी भाजपवर नाव न घेता केली आहे. ते सांगली प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सांगलीमध्ये आपत्ती मित्र समितीच्या अॅप्सचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ‘आम्ही पुन्हा येणार यात शंका नाही. पण कधी येणार याचा मुहूर्त थोड्या दिवसांत सांगू. मात्र, आमचं सरकार पुन्हा येईल, यात माझ्या मनात शंका नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.
आता कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीत भाग न घेता कोणाला निवडून यायचा ते निवडून येऊ द्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांना ताब्यात घेऊ आणि त्याची काही किंमत असेल ते मोजू, अशी नवी फॅशन देशात तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गावोगावी फिरा, प्रचार करा, लोकांना आपले मते समजवा, यापेक्षा सगळ्यांना निवडून येऊ द्यावं. त्यानंतर त्यांना गोळा करावं, हे देखील आता नवी स्टाईल राजकारणात पुढच्या दहा वर्षात निर्माण होईल. कारण निवडून आलेले एका अधिकृत पक्षातले मोठ्या प्रमाणात नेते दुसरीकडे जात असतील तर ती राजकीय आत्महत्या आहे. हे निवडणुकीच्या कायद्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे, असे मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…