पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर येतेय. चाकण जवळील आंबेठाण इथल्या लांडगे वस्तीत शेतातल्या खड्ड्यात पडून 3 सख्ख्या भाऊ-बहिणींचा मृत्यू झाला.
शेतात खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. त्यात पाणी साचलं होतं. ही तिनही भावंडं खेळता खेळता या खड्ड्यात उतरली.
पण खड्डा खोल असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. रोहित दास (वय -8), राकेश दास (वय -8), श्वेता दास (वय -4) असं मृत मुलांची नावं आहेत. एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं.
आज सकाळी या मुलांचे वडिल कामावर गेल्यानंतर तीनही भावंडं खेळण्यासाठी बाहेर गेली. घरात आई आणि सहा महिन्यांचा भाऊ होते. खेळता खेळता ही मुलं नजीकच्या शेतात गेली. यावेळी पाणी साचलेल्या खड्ड्यात उतरली. पण खड्डा खोल असल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही.
घटनास्थळी मदत कार्य पथक आणि महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय सी एम रुग्णालयात पाठविण्यात आलं आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…