देशभरात मॉन्सून आता सक्रीय झाला आहे. आता काही राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह काही राज्यात आगामी 24 अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
बिहार, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू कश्मीरमध्येह हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
मुंबईमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र, आगामी 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत तापमानात घट होत ते 38 अंशसेल्सिअसपर्यंत आले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, सिवनी, बालाघाट, मंडला, बुरहानपूर, खंडवा या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…