देशभरात मॉन्सून आता सक्रीय झाला आहे. आता काही राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह काही राज्यात आगामी 24 अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
बिहार, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू कश्मीरमध्येह हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
मुंबईमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र, आगामी 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत तापमानात घट होत ते 38 अंशसेल्सिअसपर्यंत आले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, सिवनी, बालाघाट, मंडला, बुरहानपूर, खंडवा या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…