मराठवाडय़ातून आलेल्या एका तरुणीने बाभळेश्वर येथील तरुणाशी लग्नही केले, हनीमूनही केला आणि विश्वास संपादन करून तीन लाख 70 हजार रुपये घेऊन पोबाराही केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.याप्रकरणी लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुण मामाकडे राहून मोलमजुरीचे काम करायचा. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने गावागावात अनेक अविवाहित तरुण दिसत आहेत. संबंधित तरुणाला मात्र बायको मिळाली. अश्विनी (रा. हेळस, जि. जालना) ही तरुणी आणि तिची मावस बहीण रूपा यांचा संबंधित तरुणाशी संपर्क झाला. अश्विनीशी त्याचा विवाह ठरला आणि बाभळेश्वर येथे 4 एप्रिल रोजी लग्नही झाले. लग्नानंतर ते कोल्हापूरला हनीमूनला गेले.
दोन-चार दिवस त्यांचे मजेत गेले. मात्र, 30 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या बस स्थानकावरून अश्विनी आणि रूपा पसार झाल्या. जाताना त्यांनी लग्नासाठी केलेले 70 हजार 915 रुपयांचे दागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कमही नेली. आपला विश्वास संपादन करून फसविण्यात आल्याने संबंधित तरुणाने लोणी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, अनेकजण पैसे देऊन इतर जिह्यातील मुलींशी विवाह करीत आहेत; परंतु लग्नाच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक करणाऱया काही टोळ्या याचा फायदा उठवीत असून, सावध, सतर्क आणि डोळसपणे या गोष्टी करण्याची गरज आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…