सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय, राज ठाकरेंच्या सभांमधील भाषणांवरून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पेटताना दिसत आहे.
राजकीय नेते मंडळींच्या विविध प्रतिक्रिया यावरून उमटत आहेत. जोरदार टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंच्या मुद्य्यांचा आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर काही परिणाम होऊ होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी, राज ठाकरेंना लोक फार ओळखून आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. असं म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने राज्यभर कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. याला राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा नाव देण्यात आलं आहे. या निमित्त साताऱ्यातील वाई मतदार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याप्रसंगी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी त्यांनी भोंग्यांच्या मुद्य्यावरून देखील निशाणा साधला, ”धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठीच भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा… हे करा ते करा असं सांगितलं जातय. गुजरातमध्ये मशिदींवरील भोंगे बंद झाले आहेत का?, उत्तर प्रदेशात बंद झाले आहेत का? याची जरा चौकशी करून या म्हणा.” असंजयंत पाटील यांनी बोलून दाखवलं.
भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे राज ठाकरे आज पुण्यात म्हणाले असं निदर्शनास आणताच जयंत पाटील म्हणाले की, “त्यांनी आता गुन्हा दाखल होऊ नये म्हणून याबाबत वकिलाचा सल्ला घेतलेला दिसतोय.”
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…